सार्थ तुकाराम गाथा

समर्थाचा ठाव संचलाचि असे- संत तुकाराम अभंग –1432

समर्थाचा ठाव संचलाचि असे- संत तुकाराम अभंग –1432


समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥
फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं ॥ध्रु.॥
न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥
तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥

अर्थ

संतांकडे नेहमी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान हे गुण आसतात, त्यामुळे मी दरिद्री, मला काहीतरी लाभ होईल या अपेक्षेने त्यांच्याकडे धाव घेत आहे. आता समर्थ संतांकडून जे दान मिळाले ते दान घेऊ आणि एकांतात जाऊन ते सेवन करू. संतांना दान मागण्यासाठी वेळ काळ पाहण्याची गरज नसते तर संत दान देण्यास नेहमीच तत्पर असतात. कधी कधी तर असे होते की संत आपण होऊन दान देतात. तुकाराम महाराज म्हणतात समर्थ संतांनी दिलेल्या भोजनाने पोट भरल्यानंतर देवाचे गौरवास्पद शब्दांनी स्तुती करून मी देवाची पूजा करीन.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

समर्थाचा ठाव संचलाचि असे- संत तुकाराम अभंग –1432

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *