सार्थ तुकाराम गाथा

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा- संत तुकाराम अभंग –1464

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा- संत तुकाराम अभंग –1464


आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
येथें नाहीं जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥

अर्थ

समर्थांची सेवा घडल्यामुळे मला कोणाचेही भय राहिले नाही. असे वाटते देवा आता माझ्या मनाने हाच निर्धार धरावा की, तुझ्या चिंतनात अंतर पडू देऊ नये देवाजवळ कृपे विषय दान मागण्यासाठी कधीच व कोणाचीही निराश झालेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ कोणताही भक्त येवो मग तो राजा असो किंवा रंक असो त्या दोघांवरही देवाची सारखीच कृपा असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा- संत तुकाराम अभंग –1464

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *