संत तुकाराम अभंग

अमंगळ वाणी – संत तुकाराम अभंग – 206

अमंगळ वाणी – संत तुकाराम अभंग – 206


अमंगळ वाणी ।
नये ऐकों ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा ।
त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥
याति वर्ण श्रेष्ठ ।
परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप ।
माय नावडे ज्या बाप ॥३॥

अर्थ
अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये .जो हरिकथेचा द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते .असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा .तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


अमंगळ वाणी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *