संत तुकाराम अभंग

असो आतां किती – संत तुकाराम अभंग – 410

असो आतां किती – संत तुकाराम अभंग – 410


असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझे पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । गांढयाचे कान पिळी ॥३॥

अर्थ

देवा आता तुला किती वेळा काकुळतीला यावे?माझे प्रारब्ध फारच बलवान आहे त्या पुढे तू सुद्धा दुबळा ठरतोस.हे पंढरीनाथा तू आता धारण केले तुझे पतितपावन दीनदयाला दिनबंधू हि ब्रिदे मी तुला सोडून द्यायला लगीन. तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो (गांढ्याचे)दुर्बळाचे कान पिळतो,असा नियमाच आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


असो आतां किती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *