sarth tukaram gatha

नको होऊं देऊं भावीं – संत तुकाराम अभंग – 455

नको होऊं देऊं भावीं – संत तुकाराम अभंग – 455


नको होऊं देऊं भावीं अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्यां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥
उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥

अर्थ

देवा माझ्या मना मध्ये जो काही तुमच्याविषयी भक्तिभाव आहे त्याविषयी अभावना होऊ देऊ नका आणि असे जर झाले तर मला दोषच घडेल.कारण त्याने माझे फार नुकसान होईल.जर अपार पाऊस पडला,तर सुपीक जमिनीत चांगले पिक येत पण नापीक जमिनीत पिकाचे नुकसानच होते.कल्पतरूच्या तळवटी बसून चांगली इच्छा केली,तर चांगले फळ मिळेल आणि वाईट इच्छा केली, तर तसेच वाईट फळ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात आपले आयुष्य फार थोडे आहे म्हणून आपले खरे हित आहे,त्या गोष्टीचा तू विचार कर.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नको होऊं देऊं भावीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *