sarth tukaram gatha

अवगुण तों कोणीं नाहीं – संत तुकाराम अभंग – 465

अवगुण तों कोणीं नाहीं – संत तुकाराम अभंग – 465


अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होते आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥
तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥

अर्थ

पूर्वीपासूनच कोणीही अवगुणाची स्थापना केलेली नाही मागे शिष्टांचे जसे आचार होते काही शिष्टांचे आचार होते जे अवगुणाला धरून होते जर आपण पूराणे वाचले तर त्यामध्ये आपल्याला काही शिष्टाचे अवगुण दिसून येतील ते म्हणजे असे की विश्वामित्र तपस्वी होते तरी देखील त्यांनी मेनका बरोबर संबंध केला भीष्माचार्यांनी दुर्योधनाचा पक्ष घेतला धर्मराज कधीही खोटे बोलत नव्हता तो देखील द्रोणाचार्‍या बरोबर खोटे बोलला म्हणजेच शिष्टांनी कसेही आचरण केले तर चालतात तर मग भक्ती न करणाऱ्या र्दुबाळाने अवगुणाचे वर्तन केले तर त्याच्या नावाने डांगोरा पिटवावा का? तसे देखील काही लोकांचे म्हणणे आहे पण खरे पाहिले गेले तर त्यांचे हे बोलणे बरोबर नाही.मध आणि मद्य यांना मधु हे एकच नाव आहे.तेंव्हा आम्ही मधुपान करतो असा शब्द वापरून उगाच दारू का प्यावी?म्हणजेच अवगुण कोणीही करो तो अवगुणच आहे ज्येष्ठांनी करो अथवा कनिष्ठाने करो तो अवगुणच आहे आणि सद्गुण कोणीही करो तो सद्गुणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या उच्छिष्टाचा प्रसाद लाभला आहे.तो तर मेघवृष्टी प्रमाणे भरपूर आहे.तो ग्रहण केल्या मुळे आझ्या अंगी चांगले,वाईट यांची निवड करण्याचे बळ आले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

अवगुण तों कोणीं नाहीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *