संत तुकाराम अभंग

नव्हे आराणूक संवसारा – संत तुकाराम अभंग – 47

नव्हे आराणूक संवसारा – संत तुकाराम अभंग – 47


नव्हे आराणूक संवसारा हातीं ।
सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ ।
विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु.॥
रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान ।
दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी ।
थोर होते चुकी नारायणीं ॥३॥

अर्थ
सदा-सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभराचिसुद्धा विश्रांति मिळत नाही .देव धर्म त्यांनी कोपर्‍यात टाकले आहेत, संसारातील कामपुर्तिसाठी जेव्हा हवे तेव्हा त्यांचा उपयोग करतात .रात्रं दिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही .तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा विषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वत:च स्वत:ची हत्या करतात .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


नव्हे आराणूक संवसारा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *