sarth tukaram gatha

नावडे तरि कां येतील – संत तुकाराम अभंग – 470

नावडे तरि कां येतील – संत तुकाराम अभंग – 470


नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
तुका म्हणे नाहीं संतांची मर्‍यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥

अर्थ

अहो भांडखोर लोकांना जर परमार्थ करणे आवडत नसेल तर हे त्यांचे काळे तोंड घेऊन आमच्याकडे काय येतात.हे नारायणा अध्यात्म रस परमार्थ रस या दुष्ट लोकांच्या संगती मध्ये नष्ट होतो.तोंडातून नर्कासारखे घाणेरडे शब्द काढतात.कुत्रे चांगल्या अन्नला तोंड लावून ते अन्न दुषित करते,तसेच हे आहे.तुकाराम महाराज म्हणतात जो संताची मर्‍यादा राखत नाही त्याला शिवी देवून महाराज म्हणतात तो निंद्य आहे तुम्हीदेखील अशा दुष्ट लोकांची निंदा करा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नावडे तरि कां येतील – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *