sarth tukaram gatha

उजळलें भाग्य आतां – संत तुकाराम अभंग – 483

उजळलें भाग्य आतां – संत तुकाराम अभंग – 483


उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥

अर्थ

माझे भाग्य उजळले कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली. आणि संतांच्या दर्शना मुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला.मी आपल्या संपुष्ट अशा हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवीन.तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्याठीकाणी पहिल्या पासूनच होता,पण तो माझ्या शुध्द भावनेने सापडला.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

उजळलें भाग्य आतां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *