sarth tukaram gatha

जेथें वैष्णवांचा वास – संत तुकाराम अभंग – 506

जेथें वैष्णवांचा वास – संत तुकाराम अभंग – 506


जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें रानें ॥५॥

अर्थ

जेथे वैष्णवांचा वास असतो,ती भूमी व तो देश पुण्यवान आहे.त्या ठिकाणी थोडे सुद्धा दोष नाहीत,असे यमाचे दूत यमास सांगत आहे.गरुडाचे चिन्ह असलेल्या पताकांच्या भाराने आणि प्रभूनामाच्या जयजयकाराने हि भूमी दुमदुमून जात असते.तेथील लोकांना गोविंदाच्या नामस्मरणाचा सहजच छंद लागलेला असतो.खरोखरी तुळशी वृन्दावने रांगोळ्या हा सुखसोहळा म्हणजे एक सर्वप्रकारे वैकुंठाचा सोहळाच आहे.तुकाराम महाराज म्हणतात भीतीने काळ देखील याबजूस फिरकत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जेथें वैष्णवांचा वास – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *