sarth tukaram gatha

न मनावी चिंता तुम्ही – संत तुकाराम अभंग – 565

न मनावी चिंता तुम्ही – संत तुकाराम अभंग – 565


न मनावी चिंता तुम्ही संतजनी । हिरा स्फटिकमणि केवि होय ||१||
पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांही ॥२॥
बहूतांसी भय एकाचिया दंडे । बहुत या तोंडे वचनासी ।॥३॥
तुका म्हणे नाही वैखरी बासर । करावया चार वेडे वेडे।|४॥

अर्थ

हे संतजन हो तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण स्फटिक मनी कधीही हिऱ्या याप्रमाणे होत नाही तोच स्फटिकच राहतो आणि हिरा हिराच राहतो. मी प्रसंग स्थळी परकेपणाचा भाव पाहिला त्यामुळे बोलत आहे. एका दुष्टला जर खडसावले दंड केला तर त्याचे भय सर्व दुष्टांना होते आणि एकमेकांशी चर्चा करून दंड केला दंड केला असे सर्वत्र बोल ते दुष्ट लोक करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या तोंडून कधीही वाईट विचार बाहेर येत नाहीत वेडेचारपणा तर संतांकडून कधीही घडत नाही.( एका ठिकाणी संतांच्या वचनाला प्रतिउत्तर केले त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्या दुष्ट व्यक्तीला चांगलेच खडसावले आणि संतांनी सांगितले बोल हे बरोबर आहे की संत हे कधीही चुकीचा उपदेश करत नाहीत असे अभंगातून महाराजांनी सांगितले आहे.)


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

न मनावी चिंता तुम्ही – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *