sarth tukaram gatha

कळों येतें तरि कां – संत तुकाराम अभंग – 638

कळों येतें तरि कां – संत तुकाराम अभंग – 638


कळों येतें तरि कां नोहे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥
जाणतांचि होतो घात । परिसा मात देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठे बळीवंत ॥३॥

अर्थ

सर्व काही समजते तरीदेखील काहीच न समजल्या सारखे काही लोक करतात असे ते का करतात ते काही कळत नाही परंतु असे केल्याने ते भ्रमाच्या बंधनात गुंतून पडतात. देवा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावे की सर्व काही समजत असून देखील काही लोक न समजल्या सारखे करतात त्यामुळे त्यांचा घात होतो. मासा अडकवण्यासाठी गळाच्या टोकाला आमिष लावले जाते आणि त्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो त्याप्रमाणे मनुष्य इच्छा आणि धन या दोन गोष्टींमुळे भ्रमात गुंततो व बंधनात अडकतो. तुकाराम महाराज म्हणतात जे होणार आहे ते होणारच कारण पूर्व कर्म हे फार बलवंत असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

कळों येतें तरि कां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *