sarth tukaram gatha

धीर तो कारण – संत तुकाराम अभंग – 804

धीर तो कारण – संत तुकाराम अभंग – 804


धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

अर्थ

परमार्थात जो धीर धरून राहतो त्याला नारयण साह्य करतो.त्याला कुठल्याही प्रकारचे शीण येवू देत नाही तो आपल्या सर्व दासांची चिंता वाहून नेतो आपण सुखाने हरीचे कीर्तन करावे आनंदाने हरीचे गुणगान गावे म्हणजे देवाचे सुदर्शन चक्र काळाचे निवारण करते.लहान मुलाला दुखणे आले तर आई त्याला बरे वाटण्यासाठी आपला जीव देण्यास तयार होते हि संसारातील प्राकृत गोष्ट झाली पण नारायण हा दाता प्राकृत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हि माझ्या अनुभवाची गोष्ठ आहे मात्र आपण खरी भक्ती केली पाहिजे.वर वर भक्ती काही उपयोगाची नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

धीर तो कारण – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *