sarth tukaram gatha

पंचभूतांचा गोंधळ – संत तुकाराम अभंग – 830

पंचभूतांचा गोंधळ – संत तुकाराम अभंग – 830


पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥
तेथें काय मी तें माझें । कोण वागवी ते ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥
जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥२॥
इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥

अर्थ

पंचमहाभुतांचा एकत्रित मिळून हा देह तयार झाला आणि तो देह म्हणजे मीच आहे हा अहंकार त्या जिवाला लागला.तसे पाहिले येथे माझे काय आहे जीवचा देहाशी काय संबंध आहे?देह हा काळाचे भातुके खादय आहे तरी पण जीव मोह का धरतो?जिव हा अमर आहे ज्याप्रमाणे आपण जुने वस्र टाकून नवे वस्र धारण करतो त्या प्रमाने हा देह टाकून नवीन जीव म्हणजे आत्मा नविन देह आपल्या संचिताप्रमाणे धारण करतो.आपल्या कर्माचे भोग भोगन्यासाठीच तो नविन जिव धारण करतो.आणि शेवटीतुकाराम महाराज म्हणतात इच्छाचा वेल वाढत जातो त्यामुळे जसे कर्म तशी इच्छा करुन तसेच कर्म आपल्याला भोगवे लागतात म्हणून मी खरे सांगतो त्या इच्छेला आपण खुंटित केले पाहिजे आपली इच्छा नाहिशी जो कोणी करेल तोच ब्रम्हस्थितिला प्राप्त होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

पंचभूतांचा गोंधळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *