sarth tukaram gatha

भिक्षा पात्र अवलंबणें – संत तुकाराम अभंग – 912

भिक्षा पात्र अवलंबणें – संत तुकाराम अभंग – 912


भिक्षा पात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव । भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥

अर्थ
देवाच्या नवा खाली जे भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागतात त्यांचे जिणे लाजिरवाणे असते त्यांच्या जगण्याला आग लागो अश्या माणसाची नारायण कायम उपेक्षा करतो.अश्या माणसांना हरीच्या चरणावर विश्वास नसतो त्यांची भक्ती म्हणजे हि वरवरची आहे जो पर्यंत हरी चरणावर दृढ श्रद्धा ठेऊन त्याच्यावर जीवन अर्पण केले जात नाही तो पर्यंत अश्या माणसांची भक्ती म्हणजे एक प्रकारचा व्यभिचार आहे.देवाच्या नवा खाली दिन होऊन जागा पुढे जगापुढे साकडे घालणे हे एक प्रकारचे अभाग्य आहे असे करण्याचे कारण त्याचा देवावर दृढ विश्वास नसणे.तुकाराम महाराज म्हणतात आहो हा विश्वंभर काय करू शकत नाही?फक्त तुम्ही सत्य निर्धार करून या नारायणाचे चरण कमल दृढ धरा हेच सर्व सार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

भिक्षा पात्र अवलंबणें – संत तुकाराम अभंग – 912

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *