sarth tukaram gatha

अग्नीमाजी पडे धातु – संत तुकाराम अभंग – 998

अग्नीमाजी पडे धातु – संत तुकाराम अभंग – 998


अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पावे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघेंचि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥
हस्ती परदळ जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥
पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हेचि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥

अर्थ
अग्नीत जर सोने किंवा धातू पडले तर ते त्यात लीन होतात.म्हणून ते अंती तसेच राहुण शुध्द होतात पण त्याच ठिकाणी वस्त्र किंवा धागा अग्नीत पडला तर त्यांचा नाश होतो.त्या प्रमाणे बाह्य रंग हि खोटी असतात मिथ्या असतात गर्व व अज्ञान हे मिथ्या असते पण जीव गेला तरी अज्ञान त्याच्या बरोबर असते.पूर जर आला तर लव्हाळे नम्र होऊन तसेच राहतात पण वृक्ष उन्मळून पडतात.आहो हत्ती शत्रूंना मारतो पण त्याच्या पाया खाली एक छोटी मुंगीही मरत नाही म्हणून हत्तीच्या मागोमाग त्याच्याशी लढण्यासाठी कोण जाणार?हिरा घाना खाली फुटत नाही तो त्याच्या पोटात घुसतो मग गाराही तश्याच असतात पण त्या घानाच्या खाली टिकतात काय?तुकाराम महाराज म्हणतात लीन दिन होऊन राहावे तरच आपण भवसागर तरू शकतो पण जो ऐटीत राहतो तो या भवसागारातच वाहतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

अग्नीमाजी पडे धातु – संत तुकाराम अभंग – 998

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *