सार्थ तुकाराम गाथा

विषय तो मरणसंगीं – संत तुकाराम अभंग – 1628

विषय तो मरणसंगीं – संत तुकाराम अभंग – 1628

विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥
तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुख पावो नाड ॥३॥

अर्थ

विषयाच्या संगतीने मरण येते परंतु हे सर्व जाणत असून देखील अभागी माणूस विषयांमध्ये गुंततो. अभागी मनुष्य शास्त्राला किंमत न देता विषयांमध्ये गुंतून राहतो आणि त्याच्या स्वतःच्या तोंडावर धोंडा पाडुन घेतो. ज्याला मोक्षच माहित नाहीये त्या गाढवाला काय सांगावे? तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये ज्ञानाने अभिमानी झालेले अनेक माणसे आहेत ते विषयांमध्ये फसत असतील तर खुशाल फसोत.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *