सार्थ तुकाराम गाथा

आपुल्याचा भोत चाटी – संत तुकाराम अभंग – 1627

आपुल्याचा भोत चाटी – संत तुकाराम अभंग – 1627

आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥
ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥
गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ॥२॥
तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ॥३॥

अर्थ

गाईचे मेलेले वासरु असते मग त्याच्यात भुसा भरला जातो आणि त्याचे भोत तयार केले जाते व तेच भोत गाई पुढे उभे केले जाते व ती गाय त्या भोताला चाटते व पान्हा सोडते परंतु जर त्याच गाई जवळ दुसऱ्या गाईचे वासरू आणले तर ती काय त्या वासराला मारत असते त्याप्रमाणे हे देवा हे सर्व लोक मीथ्या विषयांचा हेवा वाढवून त्यालाच भुलले आहेत. गळाला आळी लावतात व त्याच्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो व प्राणाला मुकतो. तुकाराम महाराज म्हणतात लोकहो पहा बोकडाच्यापुढे खाटकाने चारा टाकला की त्या बोकडाला त्या खाटका विषय प्रेम वाटते परंतु तोच खाटीक त्या बोकडाला नंतर मारतो.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *