सार्थ तुकाराम गाथा

तरी हांव केली अमुप व्यापारें – संत तुकाराम अभंग – 1638

तरी हांव केली अमुप व्यापारें – संत तुकाराम अभंग – 1638

तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥
जालों हरीदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥
जनावेगळें हें असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिवसीं स्वामी ॠणी ॥३॥

अर्थ

परमार्थामध्ये मी अतिशय धनवान व्हावा यासाठी मी परमार्थाचा मोठा व्यापार करत आहे. शूर शिपायाचा जसा निश्चय असतो त्याप्रमाणे मी ही परमार्थामध्ये हरिदास झालेलो आहे. हरीची प्राप्ती कशी करावी याचे वर्म मला संतांकडून समजले आहे पण हे परमार्थिक धन अलौकिक आहे, सर्वजोणां पेक्षा वेगळे आहे म्हणून ते प्राप्त करून घेण्याकरिता मी माझा जीव बळी दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे परमार्थिक धन प्राप्त करून घेण्यासाठी मी ज्यावेळी तयारीला लागलो त्याच वेळेपासून माझा स्वामी पांडुरंग माझा ऋणी झाला आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *