सार्थ तुकाराम गाथा

परद्रव्यपरनारीचा अभिलास – संत तुकाराम अभंग – 1659

परद्रव्यपरनारीचा अभिलास- संत तुकाराम अभंग – 1659

परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥
तुका म्हणे एकां थडता थवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥

अर्थ

जो मनुष्य परद्रव्य आणि परनारी यांचा भोग घेतो तिथून पुढे त्याच्या भाग्याचा ऱ्हास होतो अशा मनुष्याच्या गाठी म्हणजे पदरात अधःपतन बांधले जाते ते काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा तीन वर्षांनंतर तरी त्याचे अधःपतन होतेच. पुढे आपला घात होणार आहे याची जाणीवही त्याला होते आणि त्याचा परिणामही त्याला निश्चित होतो. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या दगडाला धडक दिली तर आपलेच डोके फुटते तसे परतद्रव्य आणि परनारीचा भोग घेतला तर काळ त्याच्या मागे लागतो आणि त्याचा ऱ्हास लवकरच होतो होतो.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *