सार्थ तुकाराम गाथा

आम्हां हरीच्या दासां कांहीं – संत तुकाराम अभंग – 1660

आम्हां हरीच्या दासां कांहीं – संत तुकाराम अभंग – 1660

आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाही त्रयलोकी ॥१॥
देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय । धावे सोय धरोनि ॥२॥
तुका म्हणे असो सुखें । गाऊं मुखे विठोबा ॥३॥

अर्थ

आम्हा हरिदासांना त्रेलोक्या मध्ये कोणत्याही प्रकारचे भय नाही कारण आमच्या मागे पुढे प्रत्यक्ष देव उभा आहे. आणि सर्व संकटापासून तो आमचे रक्षण करतो. भक्त ज्या स्वरूपाचे चिंतन करतो देव ते स्वरूप धारण करतो व त्यांच्या मदतीला नेहमी सज्ज असतो आणि भक्तांचे कार्य करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नेहमी आमच्या मुखाने हरीचे नामचिंतन करू व सुखाने राहू.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *