सार्थ तुकाराम गाथा

समर्थाचें केलें – संत तुकाराम अभंग – 1661

समर्थाचें केलें – संत तुकाराम अभंग – 1661

समर्थाचें केलें । मोडिलें कोणां जाईल ॥१॥
वांयां करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेवा जो ठेविला । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥
तुका म्हणे कोटी । वाळे जाले शूळ पोटी ॥४॥

अर्थ

प्रत्यक्ष जे समर्थाने तयार केले आहे ते कोणाकडुन मोडले जाईल? त्याने तयार केलेली कोणतीही गोष्ट मोडण्याचा प्रयत्न केला तर ती व्यर्थ खटपट होऊन शेवटी श्रम होतील. जसे आपले संचित आहे त्याप्रमाणे ते भोगावे. जो समर्थांच्या विरुद्ध व्यर्थ बडबड करतो त्याची शेवटी फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात असे कोटी अभक्त आहेत की जे भगवंताला विरोधात गेले परंतु शेवटी त्यांच्या पोटात शुळच बसला व्यर्थ श्रम झाला.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *