सार्थ तुकाराम गाथा

आवडी न पुरे सेवितां न सरे – संत तुकाराम महाराज अभंग – 1718

आवडी न पुरे सेवितां न सरे – संत तुकाराम महाराज अभंग – 1718

आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥
न पुरे हा जन्म हें सुख सांठितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तहान ॥३॥

अर्थ

हरीचे नाम कितीही सेवन केले तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि भूकही भागत नाही त्यामुळे मी हरीचे नाम घेतो आणि त्या कारणाने मला हरीची भेट झाली आहे. हरीचे सुख साठवण्या करिता हा मनुष्य जन्म पुरेसा पडणार नाही त्यामुळे पुन्हा हरीचे सुख साठविण्या करता आपण हरीला मनुष्यजन्मच मागु. पालखीत बसल्यानंतर किती कोस चालावे लागते याची चिंता पालखीत बसणाऱ्याला नसते कारण त्याला चालण्याचे श्रम नसते. त्याप्रमाणे हरीचे सुख भोगण्यासाठी आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आम्हाला त्याचे काहीच वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझी विठ्ठल माऊली मला तहान भूक लागली की सर्व काही जाणून घेते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *