सार्थ तुकाराम गाथा

नाहीं त्रिभुवनीं सुख या समान – संत तुकाराम महाराज अभंग – 1719

नाहीं त्रिभुवनीं सुख या समान – संत तुकाराम महाराज अभंग – 1719

नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती चाली चित्ता ॥२॥
तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥

अर्थ

हरी भजनाच्या सारखे सुख या त्रिभुवनात हि नाही त्यामुळे त्या ठिकाणीच माझे मन स्थिरावले आहे. विठ्ठलाचे पाऊले देखील या त्रिभुवनात ही त्याच्या समान काहीच नाही त्यामुळे मी विठ्ठलाची कोवळी पाऊले तसेच विठ्ठलाचे नाम माळ माझ्या कंठातच स्थापन केले आहे. त्यामुळे माझे शरीर त्रिविधतापासून अतिशय शितल होऊन मी विश्रांत पावलो आहे आणि या कारणामुळे मला आता संसार मधील झालेली प्रवृत्ती देखील सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता माझे सर्व सुखसोहळा पूर्ण झाले असून पांडुरंगाने माझे संपूर्ण डोहाळे म्हणजे इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *