सार्थ तुकाराम गाथा

निरोप सांगतां – संत तुकाराम महाराज अभंग – 1728

निरोप सांगतां – संत तुकाराम महाराज अभंग – 1728

निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥
तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥

अर्थ

मी देवाचा आणि संतांचा निरोप सांगताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता अजिबात बाळगणार नाही. आता आपण केवळ आनंदाने हरिकथा करण्याचे काम करावे कोणी कथा ऐको किंवा न ऐको ज्याचे त्याचे गुणदोष ज्याच्या त्याच्या माथ्यावर राहतील त्यामुळे आपण ती चिंता करू नये आपण केवळ आनंदाने हरिकथा करावी. आपण आपल्या माथ्यावरील देवाचा निरोप सांगण्याचा भार उतरावा मग तो निरोप म्हणजे हरिकथा ऐकण्यासाठी कुणी तत्पर असो किंवा नसो आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात जो हरीचा निरोप म्हणजे हरिकथा करताना हरिने सांगितलेले कार्य सांगण्यास मनामध्ये कोणाचे भय बाळगत असेल तर त्याला इहलोकातही व परलोकात ही सुख मिळत नाही.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *