सार्थ तुकाराम गाथा

शूरत्वासी मोल – संत तुकाराम महाराज अभंग – 1729

शूरत्वासी मोल – संत तुकाराम महाराज अभंग – 1729

शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाठी तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका म्हणे हरी । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥

अर्थ

कोठेही जा शुरत्वाला किंमत आहे केवळ व्यर्थ बडबड फिके बोल का उपयोगी येत नाही. केलेली प्रतिज्ञा जीवावर उदार होऊन पूर्ण करतो तोच खरा धैर्यशाली आहे. कोणतेही कार्य करताना धैर्य अतिशय महत्वाचे आहे आणि ज्याच्या अंगी धैर्य आहे त्यालाच नारायण सहकार्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “तो हरी त्याच्या भक्तांचे त्याच्या दासांचे निर्धाराने रक्षण करत असतो.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *