सार्थ तुकाराम गाथा

हरीच्या दासां भये – संत तुकाराम महाराज अभंग – 1730

हरीच्या दासां भये – संत तुकाराम महाराज अभंग – 1730

हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरीच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥

अर्थ

हरीच्या दासांना भय असते असे बोलू देखील नये. देव त्यांच्या आड उभा राहून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. हरीच्या दासांना चिंता उत्पन्न होते ही वार्ता कधीही घडणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो देव हरीच्या दासांना म्हणजे त्याच्या दासांना खाण्यासाठी अन्न, अंगावर पांघरण्यासाठी वस्त्र देऊन सर्व त्यांचे मनोरथ पूर्ण करत असतो.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *