सार्थ तुकाराम गाथा

गेला तरी जावो सुखें नरकासी – सार्थ तुकाराम गाथा 1490

गेला तरी जावो सुखें नरकासी – सार्थ तुकाराम गाथा 1490

गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥
उगीच कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥
तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥

अर्थ

दुष्ट मनुष्य सुखाने नरकात गेलात तरी जावो परंतु त्या कलंकी मनुष्याला स्पर्शदेखील करू नये. विटाळलेल्या स्त्रीच्या स्पर्शाने पानवेली ज्याप्रकारे नाश पावते तसेच दुष्ट माणसाच्या स्पर्शाने आपले हित होत नाही. त्यामुळेच त्याच्यात व आपल्यात अंतर ठेवले तरच चांगले. विटाळा ने विटाळ होतो व एकमेकांच्या स्पर्शाने वृक्षाला आलेली चांगली फळे का नासून टाकावे म्हणजे अधमाची संगती करून चांगल्या माणसाने आपले अनहीत का करून घ्यावे? तुकाराम महाराज म्हणतात लोणी जर शेणात घातले तर त्याचा काय उपयोग आहे?


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *