सार्थ तुकाराम गाथा

गंगा आली आम्हांवरी – सार्थ तुकाराम गाथा 1544

गंगा आली आम्हांवरी – सार्थ तुकाराम गाथा 1544

गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥
तेथें करीन अंघोळी । उडे चरणरज धुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥
पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥२॥
तुका म्हणे धन्य जालों । संतसागरी न्हालों ॥३॥

अर्थ

संतांची साजिरी पाऊले म्हणजे गंगा रूप आहेत आणि ती आमच्या जवळ सहजच आले आहेत. ज्या ठिकाणी संतांच्या चरणाची धूळ उडत असते तेथे जाऊन त्या धुळीने मी स्नान करीन. संतां जवळ, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ व सर्व पर्वकाळ येतात. मी संतांच्या चरणी धुळीने स्नान केले त्यामुळे माझे सर्व पाप पळाले नुसते पळाले नाही तर जळाले सुद्धा व जन्ममरणाचे दुःख नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी आज धन्य झालो कारण आज संत सागरामध्ये मी स्नान केले.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *