बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

नारद सांगे मृत्युलोकीं – संत जनाबाई अभंग – २२०

नारद सांगे मृत्युलोकीं – संत जनाबाई अभंग – २२०


नारद सांगे मृत्युलोकीं ।
हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥१॥
कैसा सत्त्वाचा समुद्र ।
ऐसा नाहीं नृपवर ॥२॥
नारदाची ऐकून गोष्‍ट ।
सुखावला तो वसिष्‍ठ ॥३॥
कोप विश्वामित्रा आला ।
कैसा वाढविता शिष्‍याला ॥४॥
तपतेजें सूर्यराशी ।
छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥
उदय पश्चिमे दिनकर ।
सत्त्व ढाळीना नृपवर ॥६॥
वसिष्‍ठाच्या ऐकुनी बोला ।
विश्वामित्रा क्रोध आला ॥७॥
जरी उतरेल माझ्या तुकीं ।
देईन आपुल्या तपासी ॥८॥
ऐसा दोघांचा संवाद ।
होतां उठला नारद ॥९॥
इंद्र म्हणे का निर्फळ ।
शब्दाशब्दीं वाढेल कळ ॥१०॥
ऐसें ऐकतां वचन ।
जनी म्हणे केलें गमन ॥११॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नारद सांगे मृत्युलोकीं – संत जनाबाई अभंग – २२०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *