संत कान्होबा अभंग

उदार कृपाळ सांगसी जना – संत कान्होबा अभंग – ४१

उदार कृपाळ सांगसी जना – संत कान्होबा अभंग – ४१


उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेले ।
नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥
काय बडिवार सांगसी वायां । ठाया पंढरिराया आहेसि आम्हां ।
एकलाचि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥२॥
कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला बाणीं ।
पडिला भूमी परी नयेचि करुणा । दांत पाडियेले दोन्हीका ॥३॥
श्रियाळ बापुडें सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ।
ऐसा कठीण कोण होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥४॥
शिबी चक्रवती करितां यज्ञयाग । त्याचें चिरलें अंग ठायीं ठायीं ।
जाच‍उनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥५॥

बळीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देउनि माथां ।
कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्र कथा ॥६॥
हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं ।
पाडिला बिघड नळदमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥७॥
आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपत्ति गाउसीच्या ।
वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उदार कृपाळ सांगसी जना – संत कान्होबा अभंग – ४१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *