संत तुकाराम अभंग

उगविल्या गुंती – संत तुकाराम अभंग – 1047

उगविल्या गुंती – संत तुकाराम अभंग – 1047


उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥
ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥
मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही मागे कित्येक भक्तांना या भवसागरातून मुक्त केले याची गणती ही करता येत नाहीये. अजामिळाने धर्माचे कोणतेही पालन केले नाही तरी त्याला मोक्ष मिळाला त्याचे धर्माच्या नावाने दिवाळे निघाले होते तरी त्याला मोक्ष तुम्ही दिला व त्याने एवढी कीर्ती केली की त्याची तुलना करता येणार नाही. त्याचे एवढे पाप होते की त्याला प्रायश्चित्त म्हणून काहीच उरले नव्हते आणि कोणीही त्याचा उद्धार करण्यास तयार नव्हते .तुकाराम महाराज म्हणतात त्या आजामिलाने फक्त एकदा नारायणा असा नामोच्चार केला तेही त्याच्या मुलाच्या निमित्ताने व त्याची वैकुंठाची वाट मोकळी झाली असा देवा तुझ्या नामाचा महिमा आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

उगविल्या गुंती – संत तुकाराम अभंग – 1047

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *