संत तुकाराम अभंग

सरळीं हीं नामें उच्चारावीं – संत तुकाराम अभंग – 1048

सरळीं हीं नामें उच्चारावीं – संत तुकाराम अभंग – 1048


सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्ण ॥१॥
पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । घेती भाव धरा एके ठायीं ॥२॥
शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥
तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभचि ॥४॥

अर्थ

राम कृष्ण हरी गोविंद सरळ प्रांजळ मनाने उच्चारावित. हरिकथा म्हणजे पुण्य पर्वकाळ आहे व त्या कथेमध्ये सर्व तीर्थे एवढेच काय पण समुद्र देखील स्नान करण्यात येतो या हरिनामा वर दृढ विश्वास ठेवला तर लाभ घरी बसल्या बसल्या येतात. शेळ्या-मेंढ्या, म्हशी ,गाय यांची पुष्कळ सेवा करावी लागते पुष्कळ उठाठेव करावी लागते पण हरिनाम रुपी कामधेनूची सेवा करण्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचे सोपे वर्म जाणले तर तुम्हाला त्या अनंताची प्राप्ती आपोआपच होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

सरळीं हीं नामें उच्चारावीं – संत तुकाराम अभंग – 1048

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *