संत तुकाराम अभंग

पाप ताप दैन्य जाय – संत तुकाराम अभंग – 1050

पाप ताप दैन्य जाय – संत तुकाराम अभंग – 1050


पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया या भेटी हरीदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दान व्रत ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥
तुका म्हणे मना जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥

अर्थ

पाप ,ताप,दैन्य हे हरिदासांच्या दर्शनाने तसेच त्यांची भेट झाली की क्षणात नाहीसे होतात. या जगामध्ये तीर्थ ,दान ,तप ,व्रत असे अनेक साधने आहेत पण वैष्णव सारखे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. जे हरी भक्त हरी कीर्तनामध्ये आनंदाने नचतात त्यांच्या चरणाची माती शंकर म्हणजे साक्षात भगवान महादेव आपल्या मस्तकाला लावतात आणि त्यांना वंदन करतात. हे वैष्णव म्हणजे हा भवसागर तरुन जाण्याकरता उत्तम प्रकारची नौका आहे त्या नावे मध्ये जो कोणी बसून जातो त्याचे हात व पाय देखील ते वैष्णव भिजू देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचे चरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

पाप ताप दैन्य जाय – संत तुकाराम अभंग – 1050

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *