सार्थ तुकाराम गाथा

जन्मा येणें घडे – संत तुकाराम अभंग – 1192

जन्मा येणें घडे – संत तुकाराम अभंग – 1192


जन्मा येणें घडे पातकाचे मूळ । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥
मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥
ठाउकाचि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥
तुका म्हणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥

अर्थ

जन्माला येण्याचे मूळ कारण म्हणजे आपले पाप आहे आणि आपल्या संचिताच्या फळा नुसार आपल्याला सुख दुःख भोग प्राप्त होतात. मग त्याविषयी कोणत्याही प्रकारचे दुःख मानून घेऊ नये आणि देवावर रुसून तरी काय उपयोग आहे? सर्वांना माहीत आहे संसारात दुख आहेच मग कोणत्याही गोष्टीचा चित्तात व्यर्थ शिण करून घेऊ नये .तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्याच नामाची आठवण ठेवावी आणि मग त्या नामाच्या ओघात जन्ममरणाचे दुख विसरून जावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जन्मा येणें घडे – संत तुकाराम अभंग – 1192

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *