सार्थ तुकाराम गाथा

नामाविण काय वाउगी – संत तुकाराम अभंग –1207

नामाविण काय वाउगी – संत तुकाराम अभंग –1207


नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥१॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें मातलासे ॥२॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥

अर्थ

अरे तू हरिनाम घे हरिनामा वाचुन व्यर्थ चावट गोष्टी वटवट करणे हे व्यर्थ आहे .अरे तू फुकट लोकांच्या गप्पा गोष्टी करत बसतो आणि जगात श्रेष्ठ राम आहे त्याचे नाव मात्र तुझ्या तोंडात येत नाही .चावट माणसे मिळून तू मद्यपान करतो आणि विषयांच्या गुणाने तू माजतोस. अरे तू चाव्हाट्या वर बसून दुसऱ्यांच्या टवळ्या करत असतो परंतु गोविंदाची आठवण तुला कधीही होत नाही. अशा अविचारी दुराचारी मनुष्यावर यम दात खात असतो .आणि केंव्हा त्या मनुष्याची आयुष्याची दोरी भरेल आणि केव्हा मी त्याला घेऊन जाईल याची वाट यम पाहत असतो .तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये नारायणाचे चिंतन तू जर केले नाहीस तर तुला यमाच्या हातून कोण सोडवेल?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नामाविण काय वाउगी – संत तुकाराम अभंग –1207

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *