सार्थ तुकाराम गाथा

देवासी तो पुरे एकभाव गांठी – संत तुकाराम अभंग –1365

देवासी तो पुरे एकभाव गांठी – संत तुकाराम अभंग –1365


देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥
कांहीं नेघें शिरी निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावेंचि ॥२॥
तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटो येत ॥३॥

अर्थ

देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनिष्ठ भक्तिभाव असणे हे पुष्कळ आहे आणि त्यानेच देवाच्या पायाला मिठी देणे शक्य होईल. मी माझ्या देहापासून वेगळा होऊन या जगाला कौतुकाने पाहत आहे. मी माझ्या शरीरावर कोणत्याही निमित्त चा भार घेणार नाही आणि त्याविषयी कोणी काही विचारले तर मी काहीच उत्तर देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि देवाची आणि जीवाची गाठ झाली कि मग ती काही केल्या सुटणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

देवासी तो पुरे एकभाव गांठी – संत तुकाराम अभंग –1365

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *