सार्थ तुकाराम गाथा

नाहीं होत भार घातल्या उदास – संत तुकाराम अभंग –1367

नाहीं होत भार घातल्या उदास – संत तुकाराम अभंग –1367


नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥
उतावीळ असे शरणागत काजे । धांवा केशीराजे आइकतां ॥२॥
तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देऊ ॥३॥

अर्थ

देवावर जो कोणी आपला सर्व भार घालील त्याविषयी देव उदास राहत नाही. त्याचे सर्व इच्छा मनापासून देव पूर्ण करतो. एखाद्या कोण्या भक्ताची देवाने उपेक्षा केली असा मला एकाचाही अनुभव आलेला नाही याउलट जो कोणी खरा भक्तिभाव देवाच्या ठिकाणी ठेवतो त्याचा उद्धार हा देव करतो. केशव राजाला भक्ताने धाव घातली की तो लगेच धावत येतो आणि भक्ताचे काम करण्यासाठी उतावीळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्तांच्या हिताची चिंता आहे आणि देव भक्तांना पुन्हा पुन्हा गर्भ वासाला येऊ देत नाही याविषयी मला भरवसा आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नाहीं होत भार घातल्या उदास – संत तुकाराम अभंग –1367

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *