सार्थ तुकाराम गाथा

उखतें आयुष्य जायांचें कलेवर – संत तुकाराम अभंग –1387

उखतें आयुष्य जायांचें कलेवर – संत तुकाराम अभंग –1387


उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥
कोणासी हा लागे पुसणे विचार । मनचि सादर करूं आतां ॥ध्रु.॥
उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥
तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगी ॥३॥

अर्थ

आपले संपूर्ण आयुष्य आणि हे शरीर जाणारे आहे आणि विषयांचे खेळ हे गारुड्याच्या खेळाप्रमाणे थोडा वेळच आहेत. हा विचार कोणालाही विचारण्याची गरज नाही आता आपणच आपल्या मनाने हा विचार करू. उत्पन्न झाला की मृत्यु आणि पुन्हा जन्म हे दळण चालू राहते. एकदा की मिष्टान्न खाल्ले की पुन्हा तसे अन्न खाण्याची वासना वाढते. तुकाराम महाराज म्हणतात आता ज्या ठिकाणी आपल्याला अभय आहे त्या ठिकाणी आपण जाऊ व देवराज पांडुरंगाला आपण वेगाने शरण जाऊ.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

उखतें आयुष्य जायांचें कलेवर – संत तुकाराम अभंग –1387

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *