सार्थ तुकाराम गाथा

लटिक्याचे वाणी वचनाचा – संत तुकाराम अभंग –1389

लटिक्याचे वाणी वचनाचा – संत तुकाराम अभंग –1389


लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥
अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥
तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडतसे ॥३॥

अर्थ

जे माणसे लबाड ढोंगी असतात त्यांचे बोलणे ही कोणाला गोड वाटत नाही व त्यांची मते देखील कोणाला मान्य होत नाही. हा त्याचा अन्याय किंवा व्यर्थ चाळा नसतो तर त्याच्या आई-वडिलांनी त्याचा गर्भ धारणेसाठी योग्य वेळ पाहीली नसते. त्या मनुष्याच्या अंगी प्रबळ अवगुण असतात व अशा मनुष्याचे मन कोठेही काम करण्यासाठी तातडी करत असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या वागण्यात आणि बोलण्यात ताळमेळ नसतो त्यामुळेच त्याच्या ठिकाणी दोष लागतो आणि त्याची फजिती होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

लटिक्याचे वाणी वचनाचा – संत तुकाराम अभंग –1389

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *