सार्थ तुकाराम गाथा

कोणापाशीं आता सांगो- संत तुकाराम अभंग –1450

कोणापाशीं आता सांगो- संत तुकाराम अभंग –1450


कोणापाशीं आता सांगो मी बोभाट । कधी खटपट सरेल हे ॥१॥
कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥
भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥
तुका म्हणे देतों देवाचें गाऱ्हाणें । माझें ऋण येणें सोसियेलें ॥४॥

अर्थ

आता मी माझे गार्हाणे तक्रार मी कोणाजवळ सांगु, संसाराची खटाटोप केव्हा संपेल? या संसाराच्या जाळ्यातून माझी सुटका केंव्हा होईल आणि माझे समाधान केव्हा होईल? संसारा मुळे माझे प्राण फुटत आहे इतर लोकांना हे दुःख माहित नाही म्हणून ते सुखी आहेत. भोगाच्या आधीच भोगा विषयी माझे मन त्रासलेले आहे आणि ते आता कोठे लपवावे. तुकाराम महाराज म्हणतात देवाविषयी मी संतांकडे तक्रार करत आहे की, देवाने माझे सेवा रुपी ऋण घेतले आहे पण त्याची परतफेड तो करत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

कोणापाशीं आता सांगो- संत तुकाराम अभंग –1450

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *