सार्थ तुकाराम गाथा

लय लक्षी मन न राहे निश्चळ- संत तुकाराम अभंग –1455

लय लक्षी मन न राहे निश्चळ- संत तुकाराम अभंग –1455


लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥
हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवि ॥ध्रु.॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥
भक्ती तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥
तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥

अर्थ

लक्ष चित्त स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करावे आणि तसे होत नाही कारण मन खूप चंचल आहे आणि मन स्थिर करण्याकरिता आसन मुद्रा जिंकावे लागते. आणि गोष्टी या सर्वसामान्य लोकांना असाध्य आहे त्यामुळे नारायणाचे नामचिंतन करावे हे चांगले. वासनेचा, कुटुंबाचा आणि विषय भोगांचा त्याग करणे याचे नाव वैराग्य आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वर्णाश्रम विहित कर्मे केली पाहिजेत. काम,क्रोध त्यांना शांत करून सर्व प्राणिमात्र, भूतमात्रांना नमन करावे याचेच नाव भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात योग, वैराग्य आणि भक्ती कर्म यांचे साध्य व साधने हे दोन्हीही अवघड आहे आणि तो मार्ग खूप अवघड आहे आणि जो त्या मार्गाने जातो त्यात त्याचा बळी ही जाऊ शकतो त्यामुळे सामान्य माणसांना नाम भक्ती म्हणजे हरीचे नाम घेणे ही साधना करावी व तीच साधना सर्व सोपी आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

लय लक्षी मन न राहे निश्चळ- संत तुकाराम अभंग –1455

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *