sarth tukaram gatha

ध्याई अंतरिंच्या सुखें – संत तुकाराम अभंग – 551

ध्याई अंतरिंच्या सुखें – संत तुकाराम अभंग – 551


ध्याई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥
अपुलाल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादें । वांयां गेली ब्रम्हवृंदें ॥५॥

अर्थ

हृदयातील(अंतरातील)हरीचे ध्यान करा.मुखाने व्यर्थ बडबड करण्यात काय अर्थ आहे.हरीचे सतचिदआनंदाची जो पर्यंत अनुभूती येत नाही,तो पर्यंत विधिनिषेधांच्या चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो.अंतरंगात हरी प्रेमाची बासरी वाजवीत आहे ती जो पर्यंत ऐकू येत नाहि,तो पर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते.मनुष्य आपल्याचं विचाराने भारलेला असतो,त्याच प्रमाणे वागतो.त्यामुळे त्याची प्रगती होत नाही.तो आहे त्या स्थितीत राहतो.तुम्ही मौन धारणा करा हरीचे चिंतन करा.बुद्धी स्थिर करा.यातच सर्व साधनाची सिद्धी आहे.तुकाराम महाराज म्हणतात विविध तऱ्हेचे व्यर्थ वाद करून काही ब्रम्‍हवृंद वाया गेले आहेत .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

ध्याई अंतरिंच्या सुखें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *