sarth tukaram gatha

आह्मीं गावें तुह्मीं कोणीं – संत तुकाराम अभंग – 642

आह्मीं गावें तुह्मीं कोणीं – संत तुकाराम अभंग – 642


आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥
सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥
येथें नाहीं लाज भक्तीभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥
सदैव ज्यां कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥५॥

अर्थ

आम्हीच हरीचे गुण गावे आणि तुम्ही ऐकणाऱ्या श्रोत्यांनी देवाचे नाम न घ्यावे असे काही देवाने सांगितले नाही.म्हणून तुम्ही हि रामराम म्हणा आणि हाताने टाळी वाजवा,तसेच आपल्या स्वहितासाठी प्रेमाने नाचा,डोला.जी गोष्ट सहज होत आहे ती करण्यास आळस काय म्हणून करावा?हात व पाय हे शेवटी अग्नीच खाऊन घेणार आहे.भक्ती भावात येथे काही लाज धरायची नसते,जो कोणीही हसेल त्याला येथे ब्रम्हहत्येचे पातक लागेल.जसा ज्याचा भाव असेल तसे त्याने निरोपण करावा,देवाला तुमचा गाण्यात ताल बरोबर आहे कि नाही यांची काळजी नसते,तुकाराम महाराज म्हणतात ज्याला नेहमी हरी कथा श्रवण करण्यास मिळते तो खरा भाग्यवान आहे इतर सर्व केवळ दगड म्हणूनच जन्माला आलेले आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आह्मीं गावें तुह्मीं कोणीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *