sarth tukaram gatha

बुद्धीचा पालट धरा – संत तुकाराम अभंग – 668

बुद्धीचा पालट धरा – संत तुकाराम अभंग – 668


बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥
अवचित निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥
यावें जावें पुढें ऐसेचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥
तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥

अर्थ

तुम्ही तुमच्या बुद्धीत बदल अवश्य करा,कारण हा नर देह पुन्हःपुन्हः मिळत नाही.आपुल्या हितासाठी तुम्ही काहीच सायास म्हणजे प्रयत्न करत नाही,तुमचे चित्त घर,दार,पत्नी,मुले,बाळे या कडे लागले आहे.अवचीत तुम्हाला हे मनुष्य जन्माचे भाग्य लागले असून,मग पुढे गर्भावासाची विपत्ती का भोगता?जर मनुष्य जन्म मिळाला नाही तर,इतर प्राणी मात्रांच्या जन्मात फिरावा लागेल व नरक वास भोगावा लागेल.तुकाराम महाराज म्हणतात यांची सर्वांनी आठवण धरावी व हरी नामाचे स्मरण करा नाही तर तुमचे काही बरे नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

बुद्धीचा पालट धरा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *