sarth tukaram gatha

न लगे मायेसी बाळें – संत तुकाराम अभंग – 847

न लगे मायेसी बाळें – संत  तुकाराम अभंग – 847


न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥
मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे माथा ॥ध्रु.॥
गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥
खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥
त्याच्या दुःखेंपणें आपणा खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥

अर्थ

मुलाचे रक्षण करावे असे आईला कधीही सांगावे लागत नाही तिचा स्वभावच प्रेमाचा असल्याने ती आपोआपच बाळांचे रक्षण करते बाळाचे रक्षण करण्यास ओढ घेते.जो विश्वाचा जनिता ज्याने मला जन्माला घातले त्याच्याच माथ्यावर माझे सर्व जड भार आहे,मग मला कुठलाही विचार करण्याची काहीही गरज नाही.जर घरात आईने गोड धोड पदार्थ केले तर ते पदार्थ आई मुलासाठी जतन करून ठेवते मुलाला सोडून खाणे हे आई समाधानकारक नसते त्यात आईचे समाधानही होत नाही.बालक जर खेळात गुंतलेले असेल तर आई त्याला शोधून आणते आणि आई त्याला खाऊ घालते.जर मुलाला दुःख झाले तर आई त्यांच्या दुखत असते तर जर एखाद्या खापरीत जश्या लाह्या तडतडत असतात,त्या प्रमाणे आईचे चित्त त्या मुला बद्दल तडफडत असते.तुकाराम महाराज म्हणतात मुलांना कसल्याही प्रकारचे आघात त्रास होऊ नये या साठी ती माऊली आपला देह भाव विसरत असते आणि त्या मुलांना जपत असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

न लगे मायेसी बाळें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *