sarth tukaram gatha

रवीचा प्रकाश । तोचि निशी – संत तुकाराम अभंग – 877

रवीचा प्रकाश । तोचि निशी – संत तुकाराम अभंग – 877


रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥
सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥

अर्थ

एकदा कि सूर्योदय झाला की अंधाराचा नाश होतो. पण जर अनेक दिवे लावले तर रात्र नाहीशी होत नाही. अगदी त्याप्रमाणे आता माझ्या अंतरंगात माझा स्वामीचे माझ्या जीवामध्ये वास्तव्य होवो. जेणेकरून आज पर्यंत ज्या काही गोष्टी होत्या जी काही वर्मे आहेत ती सर्व वर्मे मला माहीत होतील. राजा जर आपल्या बरोबर असेल तर रस्त्यामध्ये कोणीही आपल्याला आडवे येऊ शकत नाही. मग कोणाचीही विनाकारण विनवणी करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर हरी आपल्याबरोबर असेल तर जन्म-मरणाच्या सर्व गतीच खुंटतात. परंतु हे सर्व करत असताना आपल्या जवळ हरी विषय प्रेम असू द्यावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

रवीचा प्रकाश । तोचि निशी – संत तुकाराम अभंग – 877

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *