sarth tukaram gatha

न लगे देशकाळ – संत तुकाराम अभंग – 918

न लगे देशकाळ – संत तुकाराम अभंग – 918


न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया । आसनें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरेचि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥
घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव। तुका म्हणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥

अर्थ
हरीची प्राप्ती करण्यासाठी देश काळ मंत्र विधान याची गरज नसते त्याची करुणा भाकली की त्याची प्राप्ती होते.आपण जेथे जाऊ बसू त्या ठिकाणी हा हरी येतो हरी भजन केले कि हि काया म्हणजे शरीर पवित्र होते व हेच पवित्र शरीर त्याचे अधिष्टान होते.भक्तांच्या मनात चाललेला विचार कल्पनेचा तो साक्षी असतो भक्ताने दिलेले अन्न धान्य तो मटामता यो आवडीने खातो.तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या मनातील भाव ओळखू तो परमात्मा त्यांना त्यांच्याशी ऐक्य करून घेतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

न लगे देशकाळ – संत तुकाराम अभंग – 918

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *