sarth tukaram gatha

किती या काळाचा सोसावा – संत तुकाराम अभंग – 942

किती या काळाचा सोसावा – संत तुकाराम अभंग – 942


किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥
उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेचि तें ॥२॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥

अर्थ
या काळाचा किती वळसा सोसावा?कोठेही जा तरी हा काळसारखा पाठीमागे असतो.आहो या पांडुरंगाला शरण जाऊन तुम्ही आम्ही या चौऱ्यांशी लक्ष योनी तून आपली सोडवणूक करू घ्या.जन्म झाला कि मृत्यू होतो आणि मृत्यू झाला कि पुन्हा जन्म होतो.तुकाराम महाराज म्हणतात गाडग्याची माळ जशी असते एक खाली आला कि दुसरा भरतो आणि एखादे गाडगे फुटले कि ते मुक्त होते त्याप्रमाणे आपल्यातून द्वैताचा नाश झाला कि आपण हि मुक्त होऊ.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

किती या काळाचा सोसावा – संत तुकाराम अभंग – 942

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *