सार्थ तुकाराम गाथा

नाहीं कोणी दिस जात वांयांविण – संत तुकाराम अभंग – 1670

नाहीं कोणी दिस जात वांयांविण – संत तुकाराम अभंग – 1670

नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिकाचि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥
तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे ठायी होईल ते ॥३॥

अर्थ

माझा एकही दिवस हरी सेवेवाचून जात नाही परंतु साध्य काहीच होत नसल्याने व्यर्थच शिणच होत आहे असेच मला वाटत आहे देवा. देवाच्या किंवा माझ्या माथ्यावर कर्तव्याचा दोष असला पाहिजे, पण तसे म्हणावे तर मी माझे कर्तव्य व्यवस्थित करत आहे, ठीक आहे जर माझ्या नशिबातच काही फल नसेल तर काय करावे, आणि असेल तर भेटेलच. आपल्या सेवेचे काही ऋण त्याच्यावर असेल तर तो आपल्याला त्याच्याशी बोलू देईल नाही तर तो आपल्याला त्याच्याजवळ उभा करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण जसजशी सेवा करू तसतशी देवाची व आपले अधिकच ओळख होत चालते व हरीचे नीजस्वरूप कसे आहे हे समजते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *